मुंबईवर जलसंकट - केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

धरणांमध्ये २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
Mumbai water scarcity 14% water remaining in dams
Mumbai water scarcity 14% water remaining in damssakal

मुंबई : पावसाच्या आगमनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जूनचा पहिला आठवडा संपला तरी पावसाने हजेरी लावलेली नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो पुढील केवळ २२ दिवस पुरणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा होतो. मुंबईला दररोज ३,७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या सर्व धरणांमध्ये केवळ १४.६८ टक्के पाणीसाठा आहे. म्हणजे धरणात केवळ २,१२,४६१ मिलिलिटर म्हणजे २२ दिवसच पुरेल इतकाच पाणीसाठी आहे.

मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणामध्ये १४.५३ टक्के साठा आहे. मध्य वैतरणामध्ये २३.१४ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील केवळ एक दरवाजा बंद करण्यात आला आहे. एक दरवाजा उघडा ठेवण्यात आला आहे. अप्पर वैतरणामधील साठा शून्यावर आला आहेत. सर्व धरणांची मिळून १४,४७,३६३ मिलिलिटर साठवणूक क्षमता आहे. त्यातील केवळ २,१२,४६१ (१४.६८) मिलिलिटर पाणीसाठा शिल्लक आहे. आजच्या दिवशी जून २०२० मध्ये २,०६,२०५ मिलिलिटर (१४.२५) आणि २०२१ मध्ये १,८५,८६४ मिलिलिटर (१२.८४) पाणीसाठा शिल्लक होता. मुंबईत सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी या आठवड्याभरात पावसाला सुरुवात होणे गरजेचे आहे. अन्यथा पाणीबाणी निर्माण होऊन चिंता वाढू शकते.

जून महिना पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात वेळेत पाऊस सुरू झाला तर चिंता राहणार नाही. आठवड्याभरात धरण क्षेत्रात पाऊस व्हायला हवा. तोपर्यंत मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करावा.

- संजय आर्ते, मुख्य जल अभियंता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com