मुठा कालवा फुटलाच कसा?

Court
Court

मुंबई - पुण्यातील खडकवासला धरणाचा मुठा कालवा अचानक कसा काय फुटला, याचा कारणांसह खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुणे महापालिकेला दिले. 

२७ सप्टेंबरला मुठा कालवा फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले होते. तसेच, सिंहगड रोड परिसरात पाणी शिरल्यामुळे शेकडो घरे बाधित झाली. या दुर्घटनेमुळे पाचशेहून अधिक नागरिक बेघर झाले. याबाबत वकील असीम सरोदे यांनी न्यायालयात जनहित याचिका केली आहे. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पुण्यातील सर्व धरण- कालव्यांच्या परिसरामधील सर्व अतिक्रमणे हटविण्याची कारवाई कृष्णा खोरे विकास प्राधिकरणाने सुरू केली आहे. याबाबत संबंधितांना मागील वर्षी नोटीसही बजावण्यात आल्या आहेत; मात्र महापालिकेने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही, असेही या वेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. या परिसरातील पीडितांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करू नका. पुन्हा अशी घटना घडली तर पुनर्वसनाचा उपयोग होणार नाही. त्यांच्या जेवणाच्या आणि मुलांच्या शाळांबाबतही सोई उपलब्ध करा व आवश्‍यकता वाटल्यास सामाजिक संस्थांची मदत घ्या, असे निर्देश न्यायालयाने दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com