काँग्रेसचा महापौर असताना मुंबई बुडत नव्हती; पटोलेंचा शिवसेनेशी पंगा

मुंबईतल्या प्रभागरचनेबद्दल नाराज असल्याने कोर्टात जाण्याचा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.
Nana Patole
Nana PatoleSakal

मुंबईतल्या प्रभाग पुनर्रचनेबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोयीनुसार प्रभागरचना झाली नाही, तर आपण कोर्टात जाऊ असा इशाराच त्यांनी दिला आहे. तसंच सरकार तीन पक्षांचं आहे, त्यामुळे तिन्ही पक्षांचा विचार करून निर्णय व्हायला हवा, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. (Nana Patole on Maha Vikas Aghadi Government)

Nana Patole
मुंबई महानगरपालिकेची नवी प्रभागरचना जाहीर

सुरुवातीपासून वॉर्ड पुनर्रचनेवरून काँग्रेसची नाराजी होती. याबद्दल बोलताना नाना पटोले (Nana Patole Congress) म्हणाले, तीन पक्षांचं सरकार आहे, तेव्हा सगळ्या पक्षांचं मत विचारात घेऊन वॉर्ड रचना व्हायला हवी. सोबत राहून आपल्या मित्राचंच नुकसान होत असेल तर ते बरोबर नाही. आमच्या स्थानिक प्रतिनिधींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही अनेक ठिकाणी कोर्टात गेलो आहोत. ज्याप्रमाणे प्रभागरचना होत आहे. आमची मागणी दोनच्या प्रभागाची होती, पण तीनचा प्रभाग करण्यात आला. मुंबईत असेल, पुण्यात असेल, मविआतले काही पक्ष आपल्या सोयीने प्रभाग पाडत आहेत. तसं असेल तर आम्ही कोर्टात जाणार आहोत.

Nana Patole
'ती' बाब योग्य नाही, लवकरच शरद पवारांशी बोलणार : नाना पटोले

शिवसेनेवर (Shivsena )टीका करताना नाना पटोले म्हणतात, "दरवर्षी पावसात मुंबई पाण्याखाली जाते. काँग्रेसही अनेक वर्ष मुंबईच्या महापौरपदी होता. तेव्हा कधी मुंबई बुडली नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई सतत पाण्यात आहे".

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com