फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया..

फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया..

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. यानंतर महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा रस्ता मोकळा झालाय. अशातच आज संध्याकाळी महाविकास आघाडीतर्फे नेता निवडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांच्या नावावर नेता म्हणून  शिक्कामोर्तब होणार आहे. याबद्दलची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. 

कालपर्यंत भाजप आमच्याकडे संख्याबळ आहे असं बोलत होती. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर संपूर्ण चित्र बदललं आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. लोकशाहीत ज्यांना आम्हीच राहू, आम्हीच राहू असं वाटत होतं, त्यांना हा धडा आहे असं देखील नवाब मलिक यांनी पत्रकारांसमोर म्हटलंय. 

महाराष्ट्र म्हणजे कर्नाटक, गोवा किंवा मणिपूर नाही याचा पुनरुच्चार नवाब मलिक यांनी केला. दरम्यान आज होणाऱ्या नेता निवडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असे आदेश शरद पवार यांनी सर्वांना शिवसेनेच्या भाषेत दिले आहेत हे देखील नवाब मलिक यांनी नमूद केलंय.      

भाजपचा अहंकार लोकांनी संपवला. आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवरायांचं आदर्श राज्य येईल. शिवसेनेचा जन्म हा महाराष्ट्राच्या मातीत महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी झालाय. महाविकास आघाडीचं येणारं सरकार हे दीर्घकालीन असेल याची ग्वाही नवाब मलिक यांनी दिली. 

Webtitle : nawab maliks first reaction after devedra fadanavis resigned as CM of Maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com