रिक्षा परवान्यातील अडचण झाली दूर

रिक्षा परवान्यातील अडचण झाली दूर

नवी मुंबई - रिक्षा परवाने वाटपावरील निर्बंध हटवल्याने परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत; मात्र अर्ज सादर करताना त्यांना रिक्षा बॅच, परवाना शुल्कासोबत पोलिसांचे प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे; परंतु हे प्रमाणपत्र लगेच मिळत नसल्यामुळे ते सहा महिन्यांत सादर करण्याची सवलत दिली आहे. त्यामुळे अर्ज करताना येणारी ही अडचण दूर झाली आहे. अर्ज करताना हे प्रमाणपत्र सादर न केल्यास वाहन नोंदणी करेपर्यंत अर्जदार ते सादर करू शकतात, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली.

वाशीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आतापर्यंत ५०० हून अधिक जणांनी परवान्यासाठी चौकशी केली; परंतु केवळ १०० जणांनी अर्ज केले आहेत. अनेकांना पोलिसांचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्यांनी अर्ज केलेले नाहीत; परंतु त्यांना आता यामुळे दिलासा मिळाला आहे. ते अर्ज केल्यानंतर सहा महिन्यांत पोलिसांचे प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत. यामुळे जास्त अर्ज येण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com