ज्येष्ठांच्या सवलतीला अंतराची मर्यादा

MSRTC
MSRTC

मुंबई - राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून वर्षभरात चार हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास सवलतीच्या दराने करता येणार आहे. या योजनेनुसार ६५ वर्षांवरील व्यक्तींना अर्ध्या तिकिटात दिवसाला सरासरी ११ किलोमीटर एवढाच प्रवास करता येईल.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. त्याबरोबर ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात वर्षाला फक्त चार हजार किलोमीटर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. मागील वर्षात सवलतीच्या दरात ३८ कोटी वेळा प्रवास करण्यात आल्याची नोंद आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांनी ३४ कोटी वेळा या योजनेचा लाभ घेतल्याचे सांगण्यात आले.

सवलतीत प्रवासाच्या योजनांसाठी राज्य सरकार एसटी महामंडळाला दरवर्षी सुमारे १३०० कोटी रुपयांपर्यंत परतावा देते. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवास सवलतीवर मर्यादा आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या धोरणामुळे प्रवाशांची संख्या घटण्याची शक्‍यता आहे. सरकारने ९ ऑक्‍टोबरला ज्येष्ठांच्या प्रवास सवलतीवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित झाल्यानंतर होणार आहे.

औरंगाबाद ते मुंबई (३३४ किलोमीटर) या मार्गावर सहा वेळा ये-जा केली, तरी सवलतीच्या प्रवासाचे चार हजार किलोमीटर पूर्ण होतील. त्यापुढील प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट काढावे लागेल.

अशी असेल सवलत
५० टक्के - साधी एसटी गाडी
४५ टक्के - शिवशाही बस (खुर्ची यान)
३० टक्के - शिवशाही बस (शयनयान)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com