नुकसानीचे पंचनामे अखेर पूर्ण

नुकसानीचे पंचनामे अखेर पूर्ण

अलिबाग (बातमीदार) : ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत पडलेल्या परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील २३ हजार हेक्‍टर भातपीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ६४ हजार शेतकरी यात बाधित झाली असून, नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.

सुरुवातीपासून पावसाने शेतकऱ्याला मेटाकुटीला आणले आहे. भातांची रोपे लावणी योग्य झाल्यावर पावसाने जोर धरला. त्यामध्ये भाताची रोपे कुजून गेली, तर काही रोपे वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली. यावर्षी बऱ्यापैकी भातपीक आल्याने शेतकरी सुखावून गेला होता; मात्र ऑक्‍टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान पडलेल्या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास गेला. कापणी केलेल्या भाताच्या रोपांना कोंब आले. काही रोपे पाण्यात तरंगू लागली, तर काही रोपे झोपून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पावसात एकूण २३ हजार हेक्‍टर भात क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर ६४ हजार ४०० शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

काही दिवसांपासून जिल्ह्यातून नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी केली जात होती. त्या अनुषंगाने प्रशासनाने पंचनाम्याची कामे जलद गतीने सुरू केली होती. आता पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे. सुमारे १५ कोटींपेक्षा अधिक नुकसान भरपाईची अपेक्षा रायगड जिल्ह्याला आहे. त्यामुळे किती निधी सरकार जिल्ह्यासाठी देणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची पंचनामे झाली आहेत. शेतकऱ्यांनी हरभरा व मुगाचे पीक घेऊन लागवड करावी. जेणेकरून काही प्रमाणात आर्थिक फायदा होण्यास मदत मिळेल. हरभरा व मुगाची मागणी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे करावी. 
- पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com