'कोरोना तर निमित्त...'; राहुल गांधींचा मोदी सरकारवर टीका

rahul gandhi
rahul gandhi

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. कोव्हीड तो बस बहाना है असं म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे. कोव्हीड हे तर फक्त निमित्त आहे. त्यांना सरकारी कार्यालयांना स्थायी कर्मचारीमुक्त बनवायचे आहे. युवकांचं भविष्य हिरावून घ्यायचं आहे आणि मित्रांना पुढे जाण्यास मदत करायची आहे असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

ट्विटची सुरवातच त्यांनी मोदी सरकार की सोच, 'Minimum Govt Maximum Privatisation' अशी केली आहे. कमीत कमी सरकार, जास्तीत जास्त खाजगीकरण अशी मोदी सरकारची विचारसरणी असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. ट्विट करताना राहुल गांधी यांनी सोबत एका बातमीचा दाखला दिला आहे. बातमीमध्ये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कपात करण्याच्या दृष्टीने नविन पदांच्या भरतीवर सरकारने स्थगिती आणली असून रिक्त पदांची भरती केली जात नसल्याचे म्हटले आहे. #SpeakUp असा हॅशटॅग जोडून त्यांनी हे ट्विट केले आहे.
 

याआधी राहुल गांधींनी १२ कोटी रोजगार गायब, ५ ट्रिलीअन अर्थव्यवस्था गायब, सामान्य लोकांचे उत्पन्न गायब, देशातील आनंदी वातावरण आणि सुरक्षा गायब आहे. प्रश्न विचारला तर उत्तर गायब! असं ट्विट करत सरकारवर निशाणा साधला होता. सोबत विकास गायब है असा हॅशटॅग पोस्ट केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com