विनापरवानगी सहल काढल्यास कारवाई

संग्रहित
संग्रहित

अलिबाग : विद्यार्थ्यांना पर्यटनस्थळांची माहिती मिळावी, यासाठी शाळा व्यवस्थापनांकडून शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येते. सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही अटी व शर्ती लागू केल्या आहेत. सहलीसाठी परवानगी मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील ६७ शाळांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. विनापरवानगी सहल काढल्यास मुख्याध्यापकांविरोधात प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचे धाबे दणाणले आहेत. 

तीन वर्षांपूर्वी मुरूड किनाऱ्यावर पुण्यातील इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर शिक्षण विभागाने सहलींच्या आयोजनात अटींची भलीमोठी यादीच तयार केली आहे. या अटींची पूर्तता करण्यात शिक्षण संस्थांची दमछाक होत आहे. मुलांच्या सुरक्षेची पूर्ण हमी संबंधित संस्था किंवा मुख्याध्यापकांना घ्यावी लागते. 

रायगड जिल्ह्यात एकूण ६२७ माध्यमिक शाळा आहेत. यापैकी ६७ शाळांना शैक्षणिक सहलीसाठी परवानगी मिळावी, यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषद माध्यमिक विभागाकडे पाठविले आहेत. प्रशासनाने सहलीच्या परवानगीसाठी एकूण ३९ अटी शाळांना बंधनकारक केल्या आहेत. त्यात ३१ डिसेंबरनंतर सहलीचे आयोजन करू नये, तसे प्रस्ताव कार्यालयात सादर करू नये. 

सहलीला गेल्यावर अतिउत्साहामुळे काही दुर्घटना, अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने पावले उचलली आहेत. ३९ नियमांचे काटेकोरपणे पालन शाळांनी करणे आवश्‍यक असल्याचे रायगड जिल्हा परिषद (माध्यमिक) शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com