यंदाही पावसाळ्यात खड्डे

यंदाही पावसाळ्यात खड्डे

मुंबई - पावसाळा तोंडावर आला तरी रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. विविध कामांचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी स्थायी समितीत मंजूर झाले आहेत. मात्र अद्यापही रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे यंदा मुंबईचा प्रवास खड्ड्यातून होणार आहे. स्थायी समितीत सदस्यांनी शुक्रवारी त्याबाबत संताप व्यक्त केला.

तीन महिन्यांपूर्वी रस्त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मंजूर होऊनही कामाची वर्कऑर्डर काढण्यात आली नाही. पावसाला एक महिना उरला तरी रस्त्यांची कामे कधी होणार, असा सवाल करीत प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात आज सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. रस्तेकामांचे प्रस्ताव आचारसंहितेत रखडू नयेत, यासाठी फेब्रुवारीमध्येच रस्त्यांसह विविध कामांचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. प्रस्तावांच्या मंजुरीनंतर सात दिवसांत कामांची वर्कऑर्डर काढणे आवश्‍यक होते. मात्र तीन महिने उलटले तरी कार्यवाही झालेली नाही. महिनाभरात पावसाळा सुरुवात होईल. त्यापूर्वी कामे पूर्ण होणे अशक्‍य असल्याने पावसांत रस्त्यांचे काय होणार, अशी चिंता नगरसेवकांनी व्यक्त केली. रस्त्यांची कामे आचारसंहितेमुळे नाही तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रखडली, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.  

नगरसेवकांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष वेधून तातडीने कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

आचारसंहिता शिथिल झाल्यावर कामे सुरू केली जातील, असे उत्तर प्रशासनाने दिले. मात्र आचारसंहितेपूर्वी कामे मंजूर झाली आहेत; त्यामुळे आचारसंहितेचे कारण पटण्यासारखे नाही, प्रशासनाचा हा हलगर्जीपणा आहे. प्रशासनाने कंत्राटदारांची तळी उचलू नये. आम्ही खपवून घेणार नाही.
- अभिजित सामंत, नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com