मुंबई विमानतळावरील वाहतूक 31 मार्चपासून नियमित 

मुंबई विमानतळावरील वाहतूक 31 मार्चपासून नियमित 

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्यांची डागडुजी 7 फेब्रुवारी ते 30 मार्च या काळात करण्यात येत आहे. त्यासाठी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत विमानांची उड्डाणे बंद ठेवण्यात आली आहेत. या काळात दिवसाला किमान 200 विमाने रद्द करण्यात येत आहेत. 

देशातील सर्वाधिक व्यग्र विमानतळांत समावेश असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रोज सरासरी 950 विमानांची ये-जा होते. त्यापैकी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत 200 विमाने उड्डाण करतात अथवा उतरतात. या विमानतळावर सिमेंट कॉंक्रीटच्या थरावर डांबराचा थर दिलेल्या दोन धावपट्ट्या आहेत. या दोन्ही धावपट्ट्या एकमेकांना छेदतात त्या ठिकाणचे डांबर काही प्रमाणात उखडले जाते. त्यामुळे दरवर्षी धावपट्टीचे "रिकार्पेटिंग' करावे लागते. 

या कामाचे नियोजन 7 फेब्रुवारी ते 30 मार्चदरम्यान करण्यात आले. त्यासाठी 500 हून अधिक कामगार नेमण्यात आले आहेत. हे काम या काळात मंगळवार, गुरुवार व शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 7 दरम्यान केले जात आहे. होळीच्या दिवशी, 21 मार्चला डागडुजीचे काम बंद असल्याने विमानांची ये-जा दिवसभर सुरू होती. हे काम पूर्ण झाल्यानंतर 31 मार्चपासून विमान वाहतूक नियमितपणे सुरू होईल, असे सांगण्यात आले. 

सात वर्षांतच "रिकार्पेटिंग' 
नियमानुसार दर 10 वर्षांनी विमानतळांवरील धावपट्टीची डागडुजी करणे आवश्‍यक असते. मुंबई विमानतळावर हे काम सात वर्षांनी करावे लागत आहे. धावपट्ट्यांचे "रिकार्पेटिंग' यापूर्वी 2012 मध्ये झाले होते. त्यानंतर मुंबईत अतिवृष्टी झाली, तसेच विमान वाहतुकीतही मोठी वाढ झाली. त्यामुळे धावपट्टीची जास्त झीज झाली. परिणामी धावपट्ट्यांची डागडुजी सात वर्षांतच करावी लागली, अशी माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com