मिठीलगतच्या घरांचे पुनर्वसन करावे 

मिठीलगतच्या घरांचे पुनर्वसन करावे 

धारावी - मिठी नदीलगतच्या घरांचे पुनर्वसन करून, त्या रहिवाशांना घरे उपलब्ध करून द्यावीत; तसेच संरक्षक भिंतीची दुरुस्ती करण्याअगोदर या रहिवाशांची धारावीतील संक्रमण शिबिरात निवास व्यवस्था करावी, अशी मागणी भाजप मुंबई सचिव दिव्या ढोले यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

मिठी नदीचा प्रवाह धारावीतून जातो. या नदीलगत लाला चाळ आहे. तेथे ३० ते ४० वर्षांपासून जवळपास २०० कुटुंबे वास्तव्य करून आहेत. या नदीच्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाने रहिवाशांना नोटीस दिली आहे. 

या संदर्भात ढोले यांनी महापालिका प्रशासनाकडे या २०० कुटुंबांच्या पुनर्वसनाची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने पुनर्वसनाच्या मुद्द्यावर हात वर केले आहेत. येथील रहिवाशांकडे ‘धारावी पुनर्वसन प्रकल्पां’तर्गत ‘मशाल’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या पावत्या आहेत. तरीही प्रशासनाने पुनर्वसनासाठी लागणारी कोणतीही तयारी न करता रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस दिल्याची बाब निवेदनात मांडली आहे. 

पावसात राहायचे कुठे?
प्रशासनाने अचानक दिलेल्या नोटिशीमुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मुलांच्या शाळा चालू आहेत. पाऊस पडत असतानाही या रहिवाशांची निवासाची दुसरीकडे सोय केली गेलेली नाही. त्यामुळे ते रहिवासी चिंताग्रस्त आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com