ठाणे : उन्हाळ्याच्या दिवसात ठाणे व पालघर जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात जाणवते. पाणी नसल्याने अनेक गावकरी पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करतात. ग्रामीण भागातील पाणी नियोजन करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेत ठाणे व पालघर जिल्ह्यात 432 बंधारे बांधले आहेत. यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होणार आहे.
ठाणे व पालघर जिल्ह्यात पाऊस चांगला झाला तरीही उन्हाळ्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. धरणे जवळ असले तरीही गावांमध्ये पाणी पुरवठ्याची सुविधा नसल्याने हे गावपाडे तहानलेलेच असतात. नागरिकांची ही अडचण लक्षात घेत रोटरीतर्फे ठाणे व पालघर जिल्ह्यात बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. रोटेरियन हेमंत जगताप यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबविण्यात येत असून आतापर्यंत ग्रामीण पाणी नियोजन या माध्यमातून 14 कोटींच्या आसपास निधी संकलित करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षात दोन्ही जिल्ह्यात सुमारे 432 बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व "चेकडॅम' प्रकल्पांमुळे सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येला पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना दुबार पिकासाठी पाणी, गुराढोरांना पिण्यासाठी पाणी व जमिनीतील पाण्याच्या स्तराची वाढ होऊन परिसरातील विहिरी व बोअरवेलना अधिकचे पाणी मिळणे, हा या सर्व प्रकल्पांचा उद्देश हा त्रिस्तरीय उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.