समुद्रात बोटींना ५ ऑगस्टपर्यंत बंदी

५ ऑगस्‍टपर्यंत बाेटींना समुद्रात जाण्‍यास बंदी
५ ऑगस्‍टपर्यंत बाेटींना समुद्रात जाण्‍यास बंदी

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार समुद्रातील हवामान धोकादायक असून येत्या ५ ऑगस्टपर्यंत मच्छीमार बांधवांनी बोटी समुद्रात नेऊ नयेत, असा इशारा रायगड जिल्ह्याचे मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंग शिंदे-इनामदार यांनी दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे.

या सूचना मच्छीमार बांधवांना देण्यासाठी मच्छीमार सोसायट्यांच्या कार्यालयातील नोटीस फलकावर आणि डिझेल पंपावर लिहिण्यात याव्यात, असे आवाहनही सहाययक आयुक्तांनी केले आहे.  सरकारने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांसाठी खोल समुद्रात मासेमारीसाठी बंदी घातली होती. १ ऑगस्टपासून  मासेमारीची बंदी उठल्‍याने मच्छीमार बांधवांनी मासेमारीसाठी तयारी केली. गुरुवारी झालेल्‍या अपघातात  सुदैवाने आठ खलाशी बचावले; मात्र नाखवा कुटुंबीयांवर आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला. त्यामुळे असे अपघात होऊ नयेत, याकरिता ५ ऑगस्टपर्यंत बोटी न पाठविण्याच्या सूचना दिल्‍या. 

शासनाने घातलेली बंदी १ ऑगस्टपासून उठली असली तरीही हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार ५ तारखेपर्यंत समुद्र खवळलेला असणार आहे. त्यामुळे आम्ही सोसायट्यांना पत्रक देऊन त्यांच्या फलकांवर लावण्यास सांगितले आहे.
- अभयसिंह शिंदे-इनामदार, सहायक आयुक्त, मत्स्य विभाग, रायगड 

शासनाने दिलेली दोन महिन्यांची मासेमारी बंदी संपल्याने; तसेच समुद्रात तीन नंबरचा बावटा लावला नसल्याने कोळीबांधव मासेमारीसाठी समुद्रात गेले होते.
- भालचंद्र नाखवा, चेअरमन, करंजा मच्छीमार सोसायटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com