घातपातामुळे ग्रीडफेल्युअर थिअरीवर विश्वास ठेवायलाच हवा; भाजपनेत्याकडून उर्जामंत्र्यांची खिल्ली

घातपातामुळे ग्रीडफेल्युअर थिअरीवर विश्वास ठेवायलाच हवा; भाजपनेत्याकडून उर्जामंत्र्यांची खिल्ली

मुंबई  ः परवा महामुंबई परिसरात झालेले ग्रीडफेल्युअर हे घातपातामुळे झाले या उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विधानावर विश्वास ठेवायलाच हवा, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. कायम जातीय विचारांमुळे डोक्यात अंधार असलेले ग्रीडफेल मंत्री अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे. 

या ग्रीडफेल्युअरमागे घातपात आहे, असे विधान आज उर्जामंत्र्यांनी केले आहे. त्या विधानावर विश्वास ठेवावाच लागेल, मात्र या एवढ्या मोठ्या घातपाताची पुसटशी कल्पनाही राज्याच्या गृहखात्याला आली नाही. त्यामुळे प्रथम गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच राजीनामा द्यावा, अशा शब्दांत भातखळकर यांनी मंत्र्यांची टर उडवली आहे. 

ग्रीडफेल्युअर मागे घातपात या उर्जामंत्र्यांनीच सांगितल्याने त्यांच्या विधानावर विश्वास ठेवायलाच हवा. या घातपातामुळे दोघा जणांचे जीव गेले, लाखो लोकांचे प्रचंड हाल झाले, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले, एवढी हानी या ग्रीडफेल्युअर मुळे झाली. त्यामुळे खरेतर या घातपाताची चौकशी करण्याआधीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजिनामा द्यायला हवा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे. 

मुळात या ग्रीडफेल्युअरमागे घातपात आहे हे उर्जामंत्र्यांना केव्हा कळले हा मुख्य प्रश्न आहे. त्यांना हे आधीच कळले असेल तर त्यांनी त्याची कल्पना त्यांनी गृहमंत्र्यांना दिली का, याचाही खुलासा राऊत यांनी केला पाहिजे, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com