Vidhan Sabha 2019 : 'शेंडाही नाही आणि बुडकाही नाही' अशी काँग्रेसची अवस्था : उद्धव ठाकरे

Shivsena-Uddhav-Thackeray
Shivsena-Uddhav-Thackeray

मुंबई : ''आमच्यासमोर कोणताही विरोधक शिल्लक राहिला नाही. शेंडाही नाही आणि बुडकाही नाही अशी अवस्था सध्या काँग्रेसची झाली आहे, तर राष्ट्रवादीची अवस्था आधे इधर है, आधे उधर है अशी झाली आहे. काँग्रेसवाले खाऊन खाऊन थकलेत. आता न खाणाऱ्यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता आहे, त्यामुळे महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात विकास पाहिला आहे,'' असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. 

विधानसभा निवडणुकीनिमित्त मुंबईतील वांद्रे-कुर्ला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ''महात्मा ज्योतिबा फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करणार असल्याचा भाजपच्या जाहीरनाम्यातील मुद्दा मला आवडला. या दोन महाराष्ट्रातील रत्नांना भारतरत्न दिलाच पाहिजे. राहुल गांधी हे पळपुटे आहेत, त्यामुळे त्यांना सावरकर कळलेच नाहीत. त्यांना कोणता इतिहास माहित आहे? हे मला माहित नाही.''

''काँग्रेसमध्ये विचार मेला आणि विकार आला आहे. सध्याच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांकडे पाहून शरमेने मान खाली जाते,'' अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर टीका केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com