सरसकट कर्जमाफी द्या - अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawar

मुंबई - विरोधी पक्षनेते असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडला; परंतु हेच विखे आज ‘ठगां’मध्ये’ जाऊन कधी बसले तेच कळले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. शेतकऱ्यांची फसवणूक, थट्टा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना अजित पवार यांनी बालभारतीच्या नवीन शिक्षणपद्धतीचे वाभाडे काढले. ही पद्धत विद्यार्थ्यांचे वाटोळे करणारी आहे, असेही अजित पवार म्हणाले. विनोद तावडे यांनी शिक्षणमंत्री असताना ही नवीन पद्धत आणली. त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी बाजूला केले आणि शेलारांना शिक्षणमंत्री केले आहे का, असा सवाल करतानाच आता शेलार त्यात दुरुस्ती करतील, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. शिवसेनेने निष्ठावान शिवसैनिकांना डावलून जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद दिले. हा सामान्य शिवसैनिकांवर अन्याय आहे. त्यांनी किती काळ तुमच्या सतरंज्या उचलायच्या? असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला. सहा मंत्र्यांना वगळण्यात आले; त्याचे कारण काय? याचे कारण सभागृहाला कळायला हवे, असे पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com