मुंबई ः कोरोना पार्श्वभूमीवर मुंबईत तैनात असलेल्या राज्य राखीव दलातील गट क्रमांक सातच्या 175 जवानांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. शहरात कोरोनाचा धोका पाहता, या सर्व जवानांना दौंडमधील एका मंगल कार्यंलयाच्या सभागृहामध्ये क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती राज्य राखीव दलाच्या समादेशकांनी दिली.
एसआरपीएफ जवानांची एक तुकडी मुंबईतील घाटकोपर, रमाई नगर या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होती. नेहमीप्रमाणे तीन महिन्यांचा बंदोबस्त पूर्ण करून ही तुकडी परतणार होती; मात्र तत्पुर्चीच मुंबईत कोरोनाने थैमान घातले.
महत्त्वाची बातमी ः झाला खुलासा, असा घुसला भारतीय नौदलात कोरोना व्हायरस...
प्रतिदीन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, दुसरीकडे या जवानांचा कार्यकाळही संपला होता. अशातच या जवानांना दौंडमध्ये दाखल होण्याचे आदेश मिळाले होते; गेली 90 दिवस मुंबईत तैनात असल्याने या जवानांना कोरोनाची लक्षणे आहेत की नाही ? हे पाहणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्याचे आदेश एसआरपीएफच्या समादेशकांनी दिले आहेत. जेणेकरुन जवान अथवा त्यांच्या संपर्कातील कोणालाही कोरोनाची लागण होऊ नये. त्यानूसार येत्या 14 दिवसांत या जवानांना कोणालाही भेटण्याची परवानगी नसल्याचे एसआरपीएफच्या समादेशकांनी सांगितले.
srpf quarantine in daund
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.