मुंबई - मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयीन स्तरावरील प्रथम व द्वित्तीय वर्षाच्या आणि विद्यापीठ स्तरावरील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी परीक्षांचे निकाल विलंबाने लागल्याने माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून हटवण्यात आले होते. निकालाच्या गोंधळामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाली होती. पुढील शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विश्वासात घेऊन गत वर्षीचे निकाल वेळेत जाहीर केले. चालू शैक्षणिक वर्षाच्या अंतिम परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापीठाने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार परीक्षा व मूल्यमापन विभागाने जिल्हावार बैठका सुरू केल्या आहेत.
आतापर्यंत विद्यापीठाने शहर आणि उपनगरांतील प्राचार्यांशी चर्चा केली आहे. उत्तरपत्रिका तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी विद्यापीठातर्फे करण्यात आले. या आठवड्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतही बैठका होणार आहेत. प्राचार्यांना विश्वासात घेऊन अधिकाधिक प्राध्यापकांकडून पेपर तपासणीचे काम करण्याचे विद्यापीठाने ठरवले आहे. विद्यापीठाच्या या रणनितीमुळे यंदा परीक्षांचे निकाल वेळेत लागण्याची शक्यता आहे.
सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.