अकरावीच्या 90 हजार जागा रिक्‍त 

अकरावीच्या 90 हजार जागा रिक्‍त 

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीत प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेश फेरीला अवघे दोन दिवस असताना अकरावीच्या तब्बल 90 हजार जागा रिक्‍त आहेत. मागील वर्षी 70 हजार जागा रिक्त होत्या. 

अकरावी प्रवेशासाठी "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीचा तिसरा टप्पा सुरू आहे. अखेरच्या टप्प्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जागांची माहिती जाहीर केली आहे. कला शाखेतील 12 हजार 881, वाणिज्य शाखेतील 36 हजार 194, विज्ञान शाखेतील 39 हजार 776 आणि एचसीव्हीसीतील 2096 जागा रिक्त राहिल्या आहेत. ऑनलाईन प्रवेशासाठी 90 हजार 947 आणि कोट्यातील 22 हजार 211 जागा आहेत. 23 सप्टेंबरला सुरू झालेली ही प्रवेश फेरी 1 ऑक्‍टोबरला समाप्त होईल. 

ऑनलाईन प्रक्रियेत कुठेही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी, एटीकेटी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. त्यानुसार शुक्रवारी (ता. 27) विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश देण्यात आला. या विद्यार्थ्यांना आता शनिवारी (ता. 28) सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाविद्यालयात जाऊन कागदपत्रांसह प्रवेश निश्‍चित करता येईल. त्यानंतर शनिवारीच दुसऱ्या प्रकारासाठी रिक्त जागांची यादी जाहीर होईल. प्रवेशाची अंतिम यादी 1 ऑक्‍टोबरला जाहीर केली जाईल, अशी माहिती उपसंचालक कार्यालयाने दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com