तानसा, वैतरणा जलाशय काठोकाठ

Rain
Rain

नद्यांच्या परिसरातील 75 गावांना सतर्कतेचा इशारा
मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा आणि वैतरणा जलाशय कुठल्याही क्षणी भरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेने या नद्यांच्या परिसरातील 75 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरण भरू लागल्यावर अशा प्रकारचा नियमित इशारा दिला जातो, असे महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले. पावसाचा जोर अचानक वाढल्यास धरणाचे दरवाजे उघडावे लागण्याची शक्‍यता असल्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्य वैतरणा धरण भरण्यास तीन मीटर आणि भातसा धरण भरण्यास दोन मीटर पाणीपातळी कमी आहे. शहापूर तालुक्‍यातील खर्डी गावाजवळील वैतरणा नदीवरील मोडक सागर धरण लवकरच पूर्ण भरण्याची शक्‍यता आहे. तानसा गावातील तानसा धरणही भरण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे या परिसरातील गावांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com