थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट

थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट

मुंबई - थंडीसाठी आवश्‍यक असलेला "वेस्टर्न डिस्टर्बन्स' (वातावरणाच्या वरच्या स्तरातील वादळ) अफगाणिस्तानवरून पाकिस्तानपर्यंत सरकल्याने त्याचा प्रभाव मुंबईपर्यंत पोहोचला आहे. परिणामी मंगळवारी (ता. 5) पारा पाच अंशांनी घसरून 28.8 अंश सेल्सिअसवर गेला. उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका झाली असली तरीही तापमानातील चढ-उतारांमुळे आजारपणात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

थंडी गायब झाल्यामुळे दोन दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली होती. उत्तरेतील थंडीला "ब्रेक' लागल्यामुळे राज्यातही थंडी गायब झाली होती. आता मात्र उत्तरेतील थंडीसाठी आवश्‍यक असलेली "वेस्टर्न डिस्टर्बन्स' स्थिती पाकिस्तानकडे सरकली आहे. हिमालयाच्या पश्‍चिम भागांत तर 10 फेब्रुवारीपर्यंत अशी स्थिती निर्माण होईल. परिणामी उत्तरेत लवकरच कडाक्‍याची थंडी पडेल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे. उत्तरेकडून बर्फाळ वारे राज्यावरून वाहू लागल्यानंतर थंडीचा कडाका पुन्हा सुरू होईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

आजारपणात वाढ 
मुंबईत रविवारपासून वाढत असलेला पारा मंगळवारी अचानक घसरला. तापमानातील चढ-उतारांमुळे दोन दिवसांपासून दवाखान्यांत रुग्णांच्या रांगा लागल्याचे दृश्‍य आढळते. अचानक थंड वारे सुरू झाल्यामुळे नागरिक, विशेषत: लहान मुले सर्दी आणि डोकेदुखीनै हैराण असल्याची माहिती डॉ. सुहास पिंगळे यांनी दिली. थंडीमुळे वृद्धांचा त्रास वाढला असून, लहान मुलांना विषाणूजन्य तापाची लागण झाली आहे. तापमानातील बदलांमुळे आरोग्याच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. पिंगळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com