ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना आजाराने कहर केला आहे. त्यासाठी विद्यमान 4 महापालिका आयुक्तांचा बळी देत त्यांची बदली केली आहे. नियोजनात प्रशासनाबरोबर सत्ताधारी पालकमंत्री पण अपयशी ठरले असून नुसती घोषणाबाजी करणारे पालकमंत्री बदलावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.
ठाणे शहरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत पालिका आयुक्तांना दोषी धरत शासनाने ठाणे जिल्ह्यातील चार आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. प्रशासन जसे दोषी आहे. त्याप्रमाणे नैसर्गिक नियमानुसार सत्ताधारी पण तितकेच दोषी आहेत. बहुसंख्याने पालिका पालकमंत्री यांच्या ताब्यात आहेत. पालकमंत्री यांनी मोठी घोषणा करून एक हजार बेडचे रुग्णालय उभे केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन ही केले. मात्र, आज वास्तवात हा हॉस्पिटलमध्ये साधा स्टाफही नाही. पालकमंत्री कोरोनाच्या उपाययोजना बाबत मोठ्या घोषणा करतात; पण वास्तवात त्याची अंमलबजावणी होत नाही. जसे पालिका आयुक्तांची मुख्यमंत्री यांनी बदली केली, त्या प्रमाणे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्रीही बदलावा, अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.