भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे न केल्याने जाळले पीक

मुरबाड दिघेंफळ गावातील भगवान भला यांचे शेतातील भाताचे पीक जाळताना शेतकरी
मुरबाड दिघेंफळ गावातील भगवान भला यांचे शेतातील भाताचे पीक जाळताना शेतकरी

मुरबाड (ठाणे): भातशेतीच्या नुकसानीची पाहणी करून शासनातर्फे पंचनामे केले जात नाहीत म्हणून तालुक्यातील दिघेंफळ येथील दोन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भात पीक जाळून टाकले आहे. मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान भला व त्यांचे भाऊ मंगल भला यांनी आपल्या दीड एकर शेतातील रुपाली जातीचे भात पीक बुधवारी दुपारी जाळून टाकले.
   
भातपिकावर पडलेला रोग व परतीचा पाऊस यामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्याची शासनाने पाहणी करून पंचनामे करावे, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबतचे वृत्त 'सकाळ'ने 23 ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान भला यांनी दिघेंफळ गावासह परिसरातील खुटल, तळेगाव, जडई, चासोळे, वालीवरे, मेर्दी, फांगळोशी, बुरसुंगे, शिरोशी परिसरात भात पिकाचे नुकसान झाले बाबत ग्रामस्थांच्या सह्यांची निवेदने कृषी विभाग व तहसीलदार कार्यालयात वेळोवेळी दिली आहेत. परंतु, त्याबाबत काहीही कारवाई होत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. नुकसानीचे पंचनामे होतील या आशेवर पिकांची कापणी गेल्या आठ दिवसा पासून थांबवली होती. परंतु, पाहणी व पंचनामे झाले नाहीत. शेतातील पेंढा काळसर झाल्याने तो गुरांच्या खाण्यासाठीही उपयोगी होणार नाही. कापणीच्या खर्चा पेक्षा कमी उत्पन्न येणार असल्याने भात पीक जाळून टाकले, असे भगवान भला यांनी सांगितले. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com