ठाण्यात कांदळवनाची कत्तल रोखली 

ठाण्यात कांदळवनाची कत्तल रोखली 


ठाणे : ठाणे शहरामध्ये होऊ घातलेल्या वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट (खाडीकिनारा विकसित) या प्रकल्पाच्या नावाखाली खारफुटीची (कांदळवन) होणारी बेसुमार कत्तल अखेर जिल्हा प्रशासन आणि कांदळवन संरक्षण समितीने रोखली आहे.

ठाणे महापालिकेच्या ठेकेदाराला तूर्तास काम थांबवण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. दोन दिवसापूर्वी खाडी परिसरात खारफुटीवर मातीचा भराव टाकून कांदळवनाचा हरितपट्टा नष्ट केल्याची तक्रार बाळकुम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली होती. याबाबत ‘सकाळ’ने (ता. १३) वृत्त दिले होते. त्यानुसार, तहसीलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही कारवाई केली.

ठाणे महापालिकेमार्फत शहरातील खाडीकिनारी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प हाती घेतला असून यासाठी बाळकुम, साकेत परिसरामध्ये कांदळवनावर मातीचा भराव टाकण्यात येत आहे. आतापर्यंत हजारो ब्रास माती खाडीकिनारी असलेल्या कांदळवनावर टाकली जात असून शेकडो खारफुटीच्या वृक्षांची कत्तल सुरू केली होती. याबाबत तक्रार झाल्या नंतर तातडीने तहसीलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनखाली गुरुवारी पंचनामे करण्यात आले. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त होईपर्यंत ठेकेदारास काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. या वेळी ठाणे महापालिकेचे अधिकारीदेखील घटनास्थळी उपस्थित होते.
 

कोकण आयुक्तांच्या आदेशाने कांदळवन संरक्षण व संवर्धन समिती स्थापन केली आहे. ग्रामस्थांनी या समितीकडे केलेल्या तक्रारींचे आकलन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आले होते. त्यानुसार, सदरची कारवाई केली आहे. आता जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील. 
 राजीव दत्ता, सदस्य, कांदळवन संरक्षण व संवर्धन समिती
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com