
उल्हास नदी बचाव समितीची फलकांद्वारे जनजागृती
कर्जत, ता. १० (बातमीदार) : तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात अनेक जण कचरा टाकतात. काही ठिकाणी सांडपाणीसुद्धा नदीपात्रात सोडण्यात येते. यामुळे ही नदी प्रदूषित होत आहे. ही समस्या आता अधिक जटिल होत असल्याने त्याची दखल घेत नेरळ येथील उल्हास नदी बचाव समितीने नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी सूचना फलक लावले आहेत.
समिती चार वर्षांपासून नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम कारीत आहे. नदी स्वच्छ राहिली, तरच आपल्याला स्वच्छ निर्मळ पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल. त्यामुळे ही फक्त स्थानिकांची जबाबदारी नसून नदीवर येणाऱ्या प्रत्येक नागरिक आणि पर्यटकांची ही नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आहे, असे या फलकांवर लिहिले असून प्रदूषणमुक्तीसाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन समितीच्या केशव तरे यांनी केले आहे.
उल्हास नदी बचाव समितीचे सूचना फलक लावण्यासाठी गोविंद घुले, महेंद्र मराडे, रोहन तरे, अर्जुन भोईर आदी उपस्थित होते.
--
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..