इमारती सील नाही मात्र नागरिकांनो काळजी घ्या

इमारती सील नाही मात्र नागरिकांनो काळजी घ्या

इमारती सील नाही; मात्र नागरिकांनो काळजी घ्या; आरोग्य सुरक्षेसाठी वसई-विरार महापालिकेचे आवाहन वसई, ता. ९ (बातमीदार)ः गेल्या वेळेस कोरोनाचा हाहाकार झाला होता. त्यामुळे प्रतिबंधात्मक क्षेत्र, इमारती सील करणे अशी कार्यवाही करण्यात आली होती, परंतु या वेळी बाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असली तरी इमारती सील न करण्याचा निर्णय वसई-विरार शहर महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी घेतला आहे, पण नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात पाच हजार ३२२ कोरोनाबाधित विविध इस्पितळांत उपचार घेत आहेत. महापालिकेची चार रुग्णालये तसेच कोविड सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. जर कोणाला लक्षणे जाणवली, तर कोरोना चाचणी केली जात आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनची सुविधादेखील प्रशासनाने उपलब्ध केली आहे. महापालिकेने पथके तयार केली असून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात येत आहे. त्याचबरोबर गृहसंकुलांत ये-जा करणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये, मास्क परिधान करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. गृहसंकुल सील न करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांना घरी सात दिवस विलगीकरणात राहावे हा नियम बंधनकारक केला आहे. ---- इमारती सील करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही, परंतु रहिवाशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, आपल्या आरोग्याची हेळसांड होऊ नये याकरिता काळजी घेणे अत्यावश्यक आहे. विनाकारण घराबाहेर निघू नये. मास्क, सामाजिक अंतर राखावे, असे आवाहन करण्यात येत आहे. अजिंक्य बगाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com