ज्येष्ठ पत्रकार दिलीप हजारे कालवश

ज्येष्ठ पत्रकार दिलीप हजारे कालवश

ज्येष्ठ पत्रकार दिलीप हजारे यांचे निधन मुंबई : झोपडपट्टीवासियांचे ज्वलंत प्रश्न सातत्त्याने आपल्या लेखणीतून मांडणारे ज्येष्ठ पत्रकार तसेच पवईतील महात्मा फुले नगरचे संस्थापक दिलीप हजारे (५९) यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर विक्रोळी टागोरनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. दलित चळवळीपासून कार्यकर्ता म्हणून हजारे यांनी कारकिर्दीला सुरुवात झाली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई मुख्य संघटक म्हणूनही त्‍यांनी पवईत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ९० च्या दशकात पत्रकारितेला सुरुवात केल्यानंतर त्‍यांनी साप्ताहिकाचे कामही पाहिले. नवाकाळ, नवशक्ती, मुंबई सकाळमधून त्यांनी विविध विषयांवर लिखाण केले होते. नामांतराचा प्रश्न, मंडल आयोग, मुंबईतील झोपडपट्टीवासांचे प्रश्न, दलित-बौध्दांवर होणारे अन्याय-अत्याचार, स्त्रियांचे प्रश्न, असंघटीत-असुरक्षित कामगारांचे मजुरांचे प्रश्न इत्यादी प्रश्नावर लिहिण्यावर हजारे यांचा अधिक भर होता. मुंबईतील झोपडपट्टी-एक उपेक्षित जग हे त्यांचे पुस्तक प्रचंड गाजलं होते. काही महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, पत्नी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com