टीईटी पास नसलेल्या शिक्षकांचे वेतन अखेर बंद

टीईटी पास नसलेल्या शिक्षकांचे वेतन अखेर बंद

टीईटी पास नसलेल्या शिक्षकांचे वेतन अखेर बंद मुंबई, ता. १२ : मागील सात वर्षांत अनेकदा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पास होण्यासाठी संधी देऊनही ती पास न झालेल्या शिक्षकांवर आता वेतन बंद करण्याची कारवाई शिक्षण विभागाने सुरू केली आहे. मुख्याध्यापक आणि संस्थांचालकांनी वेतनासाठी पुढाकार घेतल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. २०१३ पासून राज्यातील अनुदानित शाळांमध्ये रुजू झालेल्या आणि टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण व्हावे, यासाठी शिक्षण विभागाने वेळोवेळी आदेश जारी केले होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने या शिक्षकांचे वेतन रोखण्याची कारवाई केली जात आहे; मात्र एखाद्या शाळेने अशा शिक्षकांचा पगार काढल्यास तेवढी रक्कम मुख्याध्यापकांच्या पगारातून वसूल करण्यात येईल, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. १३ फेब्रुवारी, २०१३ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये नियुक्त होण्यासाठी शिक्षकांना टीईटी परीक्षा पास होणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यासाठी कालमर्यादा निश्चित केली होती. २४ ऑगस्ट २०१८ च्या शासन निर्णयानुसार नोकरीवर असलेल्या तसेच नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांनी ३० मार्च २०१९ पर्यंत टीईटी परीक्षा पास होणे बंधनकारक होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com