पुन्हा पँथरची चळवळ उभारणे आवश्यक!

पुन्हा पँथरची चळवळ उभारणे आवश्यक!

पँथरची चळवळ पुन्हा उभारणे आवश्यक! केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मत मुंबई, ता. १४ : राज्यात पुन्हा एकदा पँथरची चळवळ आणि तिची उभारणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे तरुणांना एक मोठा पर्याय मिळेल. या पँथरच्या माध्यमातून नवीन तरुण एकत्र येतील, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या कार्यक्रमात व्यक्त केला. आठवले यांनी या कार्यक्रमात सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर मनमोकळेपणाने उत्तरे दिली. राज्यात रिपाइं गटांचे ऐक्य होणे कठीण असल्याचे सूतोवाच करत जोपर्यंत ॲड. प्रकाश आंबेडकर ऐक्यात येत नाहीत तोपर्यंत या ऐक्याला अर्थ नाही. त्यामुळे रिपाइं ऐक्याची वाट आता कठीण असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले. देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसंदर्भात आठवले म्हणाले की, उत्तर प्रदेश, मणिपूरमध्ये काही जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यात भाजपने शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचा प्रस्ताव द्यावा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवावे, असा सल्लाही आठवले यांनी दिला. उत्तर प्रदेशात भाजपचीच सत्ता येईल! उत्तर प्रदेशात भाजप सोडून स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पक्षात यावे यासाठी प्रयत्न केला होता; मात्र ते आले नाहीत ते बरे झाले. अन्यथा आमच्याकडूनही ते दुसरीकडे निघून गेले असते, असा टोला आठवले यांनी लगावला. अनेक जण उत्तर प्रदेशात भाजपला सोडून जात असले तरी त्याचा कोणताही परिणाम निवडणुकीवर होणार नाही. भाजपची सत्ता परत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com