मार्गदर्शक तत्त्वांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मार्गदर्शक तत्त्वांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मार्गदर्शक तत्त्वांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १५ : मुंबई उच्च न्यायालयाने कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना (एसओपी) विरोध करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ॲड. घनश्याम उपाध्याय यांनी केलेल्या याचिकेत उच्च न्यायालयाच्या ‘एसओपी’वर आक्षेप घेतला आहे. कोरोनासंबंधित रुग्ण मुंबईत वाढत आहेत. त्यामुळे न्याय प्रशासनाने सध्या कामाची वेळ १२ ते ३ अशी जाहीर केली आहे. ११ ते २८ जानेवारी या काळात जेवणाची सुटी वगळता सलग काम चालणार आहे. एका बैठकीत मुंबई पालिका प्रशासन आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांचा याबाबत सल्ला घेण्यात आला आहे. उपाध्याय यांनी केलेल्या याचिकेत संबंधित नियोजन अवास्तव आणि अकारण असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने ऑनलाईन कामकाजाच्या वेळा कमी न करता सुनावणी घ्यायला हवी. कामाच्या वेळा कमी केल्याने वकिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच पक्षकारांनाही सुनावणी पासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे वकील आणि पक्षकारांचा मूलभूत अधिकार बाधित होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ... ‘ताण कमी होईल’ राज्यातील सर्व न्यायालयांचे ऑनलाईन कामकाज पूर्णवेळ सुरू ठेवावे, अशी मागणी उपाध्याय यांनी याचिकेत केली आहे. तसेच न्याय प्रशासनाने नव्याने सूचना निर्धारित करून कामाची वेळ कमी होणार नाही, याबाबत सतर्क राहण्याची विनंती केली आहे. याचिकांचा निकाल लागून प्रलंबित याचिकांची संख्या वाढणार नाही आणि भविष्यात न्यायालयांवर अधिक ताण येणार नाही, असेही म्हटले आहे. मुंबई, पुणे, रायगड आणि अलिबाग न्यायालयात सकाळी ११ ते ४ दरम्यान ५० टक्के कर्मचाऱ्यांसह काम चालवण्यात येत आहे. काही प्रकरणे प्रत्यक्ष सुनावणीतही सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com