
ठाण्यात आरटीईसाठी साडेदहा हजार अर्जांची निवड
ठाणे, ता. ८ : राज्य स्तरावरून आरटीई २५ टक्के प्रवेशाची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या निवड यादीमध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण १०,४२९ अर्जांची निवड झाली आहे. निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे. वंचित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे, यासाठी राज्य सरकारमार्फत दरवर्षी आरटीई मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा जिल्हात ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश प्रक्रियेतील निवड झालेल्या बालकांचे प्रवेश घेण्याकरता पालकांनी अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका, महापालिकेच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून आपला प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करायची आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..