
जिल्ह्यात विशेष ग्रामसभा
जिल्ह्यात विशेष ग्रामसभा
अलिबाग, ता. १७ (बातमीदार) ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर झेंडा’ अभियान राबविण्याच्या सूचना जिल्हास्तरावर देण्यात आल्या आहेत. त्यानिमित्त राष्ट्रप्रेम व विविध उपक्रमांबाबत जनजागृतीसाठी जिल्ह्यात ८ ऑगस्टला विशेष ग्रामसभा घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यामध्ये लहान मुलांपासून सर्वांनाच देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या महापुरुषांचे स्मरण आजच्या पिढीला राहावे. ही संस्कृती रुजविण्यासाठी जिल्ह्यात ‘हर घर झेंडा’ अभियान राबविला जाणार आहे. अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात महापंचायत राज अभियानही घेतला जाणार आहे. त्यात विवाह नोंदणी, मालमत्तेची नोंदणी, वारस नोंदणी, अतिक्रमण नियमित करणे, सुरक्षा विमा योजना पोषण अभियान, इ-श्रम कार्ड, गॅस कनेक्शन देणे, बचत गट तयार करणे असे उपक्रम राबविले जाणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36709 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..