
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग अद्याप अपूर्णच
कर्जत, ता. २६ (बातमीदार) ः कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाकडून चार ते पाच वर्षांपासून सुरू आहे. हे काम अठरा महिन्यात पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र कामाला विलंब झाला असून अपूर्ण, खोदलेल्या, खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, याची प्रतीक्षा नागरिकांसह वाहनचालकांना होत आहे.
सुमारे तीन ते चार वर्षांपासून कर्जत-मुरबाड राष्ट्रीय मार्गावर कर्जत ते कशेळेदरम्यानचे काम कासवगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत, तर काही ठिकाणी खड्ड्यांचे पॅच भरणे बाकी आहेत. अनेकदा खोदलेल्या रस्त्यावर अपघातही झाले आहेत.
मार्केवाडी कडावदरम्यान काँक्रिटचा रस्ता जोडला न गेल्यामुळे भला मोठा खड्डा पडला आहे. अशीच अवस्था वारे ते कशेळेदरम्यान आहे. मार्गावरील पोशिर, वंजारवाडी, भागूची वाडी येथील नदीवरील पुलांचीही दुरवस्था झाली आहे.
पहिल्याच पावसात पुलांवर मोठमोठे खड्डे पडल्याने चालकांना कसरत करून वाहने चालवावी लागतात.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36821 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..