
घरोघरी तिरंगा प्रचार अभियान रॅली
खोपोली, ता. १ (बातमीदार) ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने केंद्र व राज्य सरकारकडून ''हर घर तिरंगा'' अर्थात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात अभियान यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना शैक्षणिक, सामाजिक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्या अंतर्गत खोपोलीत सोमवारी काढण्यात आलेल्या घरोघरी तिरंगा प्रचार रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रॅलीत तहसीलदार आयुब तांबोळी, मुख्याधिकारी अनुप दुरे, पोलिस निरीक्षक शिरीष पवार व त्यांचे अधिकारी, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, सुमन औसरमल, सुनील पाटील, ज्येष्ठ नेते मोहन औसरमल यांच्यासहित शहरातील सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी, लायन्स क्लब, रोटरी क्लब पदाधिकारी, सर्व शाळांमधील विद्यार्थी, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी व आजी-माजी लोकप्रतिनिधी, व्यापारी संस्थांचे पदाधिकारी आदी सहभागी झाले होते. रॅली जनता विद्यालयाच्या प्रांगणातून सुरू होऊन वरची खोपोली मार्गे-बाजारपेठ, भाजी मंडईमार्गे खालची खोपोली येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे विसर्जित करण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05823 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..