
मध्य रेल्वेकडून ६९० उन्हाळी विशेष रेल्वे
मुंबई, ता. १० : मध्य रेल्वेने उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने विद्यमान गाड्यांव्यतिरिक्त मध्य रेल्वेकडून एकूण ६२६ रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक रेल्वेगाड्या सोडण्याचा विक्रम मध्य रेल्वेने केला आहे.
---
उन्हाळ्यातील विशेष रेल्वे
- लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार, बलिया, गोरखपूर, मऊ, समस्तीपूर, बनारस तसेच थिवीदरम्यान ३०६ रेल्वे
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मनमाड, नागपूर, मालदा टाऊन तसेच रिवादरम्यान २१८ विशेष रेल्वे
- पुणे आणि करमळी, जयपूर दानापूर, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन तसेच कानपूर सेंट्रल दरम्यान उन्हाळ्यात १०० रेल्वे
- नागपूर आणि मडगाव दरम्यान २० विशेष रेल्वे
- साईनगर शिर्डी आणि ढहर का बालाजी दरम्यान २० विशेष रेल्वे
- पनवेल आणि करमाळी दरम्यान १८ विशेष रेल्वे
- दादर आणि मडगावदरम्यान सहा विशेष रेल्वे
- लातूर आणि बिदर दरम्यान दोन विशेष रेल्वे
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06182 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..