
संदीप देशपांडेंना तूर्तास अटकेपासून संरक्षण नाही
मुंबई, ता. १० : भोंगा प्रकरणात पोलिसांना गुंगारा देऊन पळालेले मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आता १७ मे रोजी सुनावणी होणार आहे. सत्र न्यायालयाचे संबंधित न्यायाधीश आज गैरहजर असल्यामुळे जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे अटकेपासून कोणतेही संरक्षण न मिळाल्यामुळे देशपांडे आणि धुरी यांच्या अडचणी वाढल्या असून पोलिस कोणतीही कारवाई करण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे मनसैनिकही आक्रमक झाले आहेत. देशपांडे आणि धुरी यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस गेले होते. मात्र, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाली होती. त्याबाबत शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06188 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..