
राज्यात दिवसभरात 263 नवीन रुग्णांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : राज्यात मंगळवारी एकूण २६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून दोन मृत्यू झाले. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,८०,३३७ झाली आहे. आज २४० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३१,०२९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे. दरम्यान, राज्यात आज १,४५५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस सक्रिय रुग्ण ही वाढत असून राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात शुक्रवारी दोन कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,४७,८५३ एवढे मृत्यू नोंदवले गेले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०५,०९,४७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८०,३३७ (०९.८४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06237 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..