
रिया चक्रवर्ती प्रकरणाचा फेरतपास करा!
मुंबई, ता. २९ : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अमली पदार्थ प्रकरणात मिळालेल्या क्लिन चीटनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या प्रकरणाचा फेरतपास करण्याची मागणी ज्येष्ठ वकील ॲड. सतीश मानेशिंदे यांनी केली आहे. आर्यनच्या प्रकरणाचा पुन्हा तपास झाला, त्याप्रमाणे रियावर दाखल झालेल्या फिर्यादीवरही पुन्हा तपास व्हायला हवा, असे त्यांनी सांगितले.
आर्यन खानप्रमाणेच रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्याकडेही अमली पदार्थ सापडले नव्हते. त्यांची तपासणीदेखील झाली नाही. एनसीबीने बॉलीवूडच्या अनेक जणांना चौकशीसाठी समन्स बजावले होते, पण ते समन्स कशासाठी होते, हे कोणालाही कळाले नाही. एनसीबीने गत तीन वर्षांत बॉलीवूडमधील अनेकांना चौकशीसाठी बोलविले आहे. त्यामुळे बॉलीवूडबाबत समाजात चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे अशा प्रकरणांची पुन्हा चौकशी होण्याची गरज आहे, असे ॲड. मानेशिंदे म्हणाले.
----
रिया ड्रग्ज घेत नाही आणि तिच्याकडे अमली पदार्थही सापडले नाहीत. केवळ व्हॉट्सॲप संवादावरून आरोप करण्यात आले. त्यामुळे याबाबत पुन्हा तपास करायला हवा.
- ॲड. सतीश मानेशिंदे, वकील.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06525 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..