
कोरा केंद्र उड्डाणपुलाचा वाद उच्च न्यायालयात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : बोरिवलीतील कोरा केंद्र येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला आहे. निर्माणाधीन असलेल्या या पुलाच्या बांधकामाच्या किमतीत ५० टक्क्याने वाढ झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई महानगर पालिकेविरोधात करण्यात आली आहे. यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने पालिकेला दिले.
बोरिवली पश्चिमेकडील कोरा केंद्र परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वे मार्ग ते कल्पना चावला चौकापर्यंत नवा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या कामाला नोव्हेंबर २०१८ मध्ये सुरुवात झाली होती. त्या वेळी हे काम २४ महिन्यांत पूर्ण होणार होते; मात्र पुलाचा विस्तार करण्यासाठी आणखी काम वाढल्यामुळे उड्डाणपुलाच्या खर्चातही ५० टक्के वाढ करण्यात आली, परंतु काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराच्या कुटुंबीयांना उड्डाणपुलाचे कंत्राट देण्यात आले आहे, असा आरोप याचिकेत केला आहे. याचिकेची दखल घेत न्यायालयाने महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत १२ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06924 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..