
आरोग्य वीमा तक्रारींचे निरसन करणार!
मुंबई, ता. ५ : कोरोना काळात पॉलिसीधारकांनी केलेल्या दाव्यांच्या निवारण प्रक्रियेत विमा कंपन्यांनी केलेल्या अनियमित व्यवहाराची चौकशी केली जाईल. तसेच याबाबतच्या तक्रारींचे निरसन करणार असल्याचे आश्वासन विमा नियमन विकास प्राधिकरणातर्फे (आयआरडीए) मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले. याबाबतची नोंद घेऊन न्यायालयाने सदर याचिका निकाली काढली.
कोरोनाकाळात नोकऱ्या गमावणाऱ्या पॉलिसीधारकांनी केलेले दावे विमा कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने नाकारण्यात आले. त्याविरोधात मानव सेवा धामच्या वतीने ॲड. युसूफ इक्बाल यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. विमा कंपन्यांनी मनी लॉण्डरिंग तसेच बॅंकेच्या एजंटना अधिक कमिशन देऊन गुन्हेगारी कृत्यांसाठी पॉलिसीधारकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा दावा याचिकेत केला होता. याचिकेवर न्या. अनिल मेनन आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांकडून आलेल्या तक्रारींचे निरसन करण्यात येईल, असे आश्वासन ‘आयआरडीए’कडून खंडपीठाला देण्यात आले. त्याची दखल घेत दोन्ही पक्षकारांच्या संमतीने खंडपीठाने याचिका निकाली काढली.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07336 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..