
राज्यभरात शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत
मुंबई, ता. ३१ : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून रविवारी (ता. ३१) राज्यभरात घेण्यात आलेली पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षा परिषदेने केलेल्या नियोजनामुळे शहरी आणि ग्रामीण भागात परीक्षेच्या काळात कोणत्याही अडचणी उद्भवल्या नसल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले.
राज्यातील ३८ जिल्ह्यांत पाच हजार ७६० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही परीक्षेला सात लाख २१ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी आठवीच्या परीक्षेत एकूण ९२.४३ टक्के; तर पाचवीच्या परीक्षेत ९१.८३ टक्के विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली. या परीक्षेला सुमारे ११ जिल्ह्यांतील माहिती वगळता पाचवीच्या परीक्षेत २१ हजार ४४; तर आठवीच्या परीक्षेत १३ हजार ७१४ विद्यार्थी अनुपस्थित राहिले; तर उर्वरित ११ जिल्ह्यांतील आकडेवारी लक्षात घेता ही संख्या मोठी असल्याचेही सांगण्यात आले.
मुंबईत दक्षिण मुंबई, मुंबई पश्चिम, मुंबई उत्तर आणि मुंबई मनपाच्या शाळांमधून सरासरी ८७ टक्केंच्या वर उपस्थिती राहिली; तर पाचवीच्या परीक्षेला बसलेल्यांमध्ये एक हजार ३३० विद्यार्थी गैरहजर राहिले; तर आठवीच्या परीक्षेतील एक हजार १२४ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07871 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..