बारावीच्या परीक्षेचे गणित कोलमडणार?

बारावीच्या परीक्षेचे गणित कोलमडणार?

मुंबई, ता. १३ : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या कामकाजावरच बहिष्कार टाकला. त्यामुळे या परीक्षा अडचणीत सापडल्याचा दावा काही संस्थांनी केला आहे. दुसरीकडे बारावीच्या लेखी परीक्षेला केवळ काही दिवसाचा कालावधी उरल्याने असंख्य विद्यार्थी अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आश्वासित प्रगती योजना, जुनी पेन्शन योजना तसेच मानधनात भरीव वाढ करणे, आदी मागण्यासाठी शिक्षकेतर संघटनांनी, तर दुसरीकडे शिक्षक संघटनानी राज्य शिक्षण मंडळ आणि शालेय शिक्षण विभागाकडून वेळोवेळी शिक्षकांच्या विविध कामकाजांना दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई विभागातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक हे १५ मार्चला राज्य शिक्षण मंडळाच्या वाशी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा अडचणीत येतील, असे संस्थाचालक संघटनाचे म्हणणे आहे.
---
...तर लेखीनंतर तोंडी परीक्षा!
राज्य शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. तत्पूर्वी १६ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा घेणे अपेक्षित होते; मात्र अनेक महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा होऊ शकल्या नाहीत. ज्या महाविद्यालयात प्रात्यक्षिक परीक्षा होऊ शकल्या नाहीत, तेथे लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेऊ शकतात. त्‍यामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी महाविद्यालयांनी विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधून लेखी परीक्षेनंतर नियोजन करावे, अशा सूचनाही मंडळाने दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com