पहिल्या बौद्ध धम्म पदयात्रेचा समारोप

पहिल्या बौद्ध धम्म पदयात्रेचा समारोप

मुंबई, ता. १४ : तथागत गौतम बुद्ध यांचा अस्थि धातूकलश घेऊन परभणी ते चैत्यभूमी निघालेल्या देशातील पहिल्या बौद्ध धम्म पदयात्रेचा उद्या (ता.१५) समारोप होणार आहे. ५७० किलोमीटर पायी चालत ही पदयात्रा बुधवारी चैत्यभूमीवर पोचणार आहे. या यात्रेत थायलंड येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू संघातील ११० भिक्खू सहभागी झाले आहेत.
शांती आणि समतेचा संदेश देण्यासाठी परभणी ते चैत्यभूमी अशा बौद्ध धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, सिने अभिनेते तथा धम्मदूत गगन मलिक यांच्या संयुक्त विद्यमाने १७ जानेवारीला ही यात्रा परभणी येथून निघाली. या यात्रेत थायलंड येथील ११० बौद्ध भिक्खू यांच्यासह तथागत गौतम बौद्ध यांचा अस्थि धातूकलश घेऊन सहभागी झाले आहेत. ही यात्रा ५७० किलोमीटरचा पायी प्रवास करून बुधवारी चैत्यभूमीवर पोचणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चैत्यभूमीवर या धम्म पदयात्रेचा समारोप होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com