वरळी अपघात प्रकरणातील आरोपीला जामीन नामंजूर

वरळी अपघात प्रकरणातील आरोपीला जामीन नामंजूर

मुंबई, ता. २७ : वरळीमध्ये सुसाट गाडी चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या आरोपी सुमेर मर्चंटचा (वय २४) जामीन अर्ज महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नामंजूर केला. अपघाताच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत होता, असा फॉरेन्सिक अहवाल आला आहे, असे आज न्यायालयात सांगण्यात आले.
कलिना येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची चाचणी करण्यात आली. यामध्ये आलेल्या अहवालात त्याने घटनेच्या दिवशी मद्यपान केले होते आणि त्याचे प्रमाण अधिक होते, असे नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती सरकारी पक्षाकडून देण्यात आली. वरळी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी वरळी किनाऱ्यावर सकाळच्या वेळी जॅगिंग करत असताना राजलक्ष्मी रामकृष्णन (वय ५४) या महिलेला सुमेरच्या गाडीने धडक दिली. त्या वेळी परिसरात असलेल्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. जामीन मिळण्यासाठी आता तो सत्र न्यायालयात अर्ज करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com