आरटीई प्रवेशासाठी दिलासा,

आरटीई प्रवेशासाठी दिलासा,

मुंबई, ता. २४ : बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुनसार राज्यातील खासगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ८ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी यासाठीची माहिती दिली.
१३ एप्रिल रोजी आरटीईच्या प्रवेशाची सोडत जाहीर झाल्यापासून त्यासाठी सुरू असलेल्या संकेतस्थळात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्या, त्यामुळे पालकांना आपल्या मुलांचे प्रवेश घेता आले नाहीत, त्यामुळे पालकांची अडचण लक्षात घेऊन आरटीई प्रवेशाच्या सोडतमध्ये ज्यांची निवड झाली, त्यातील सर्व पालकांना आपल्या पाल्यांचे प्रवेश हे ८ मेपर्यंत घेण्याची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे शिक्षण संचालक गोसावी यांनी सांगितले.
आरटीई प्रवेशासाठी ५ एप्रिल रोजी सोडत जाहीर करण्यात आली होती, त्यामध्ये १ लाख १ हजार ८४६ जागांसाठी ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली होती. त्यानंतर या सोडतीत यशस्वी झालेल्या मुलांच्या प्रवेशसाठी १३ एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. ती २५ एप्रिलपर्यंत होती. मात्र त्यादरम्यान संकेतस्थळच चालत नसल्याने अनेक पालकांचे प्रवेश होऊ शकले नव्हते. संकेतस्थळ चालत नसल्याने या प्रवेशासाठी निवड झालेल्या ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांपैकी केवळ १४ हजार १२१ मुलांचे आजपर्यंत प्रवेश निश्चित झाले असून हजारो पालक अजूनही प्रवेशापासून दूर राहिले असल्याचेही समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com