राज्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू

राज्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : सोमवारी कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद झाली असताना मंगळवारी कोरोनामुळे राज्यात तिघांचा मृत्यू झाला. राज्यात मंगळवारी ७२२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून मुंबईत १९१ नवीन रुग्णांची नोंद असून राज्यात झालेल्या तीन मृत्यूंपैकी एक मृत्यू मुंबईतील आहे.
राज्यात मंगळवारी ७२२ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यात बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ६२ हजार ८४२ वर पोहोचली आहे; तर राज्यात तिघांचा मृत्यू झाल्याने राज्यात मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ५०७ वर पोहोचली आहे. दिवसभरात राज्यात ९४६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने राज्यात आतापर्यंत ८० लाख ८ हजार ७८६ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे राज्यात ५,५४९ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत मंगळवारी १९१ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ६२ हजार १३७ वर पोहोचली आहे; तर दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७६२ वर पोहोचली आहे. मुंबईत मंगळवारी २१९ कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत मुंबईत ११ लाख ४१ हजार १४० रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे मुंबईत सध्या १,२३५ सक्रिय रुग्ण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com