शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित धोरण

शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित धोरण

मुंबई, ता. २४ : राज्यातील जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी आज सुधारित धोरण ग्राम विकास विभागाने जाहीर केले. यात बदली झालेल्या शिक्षकांना रुजू अथवा कार्यमुक्त करून घेण्याचे अधिकार हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत; तर बदलीसाठी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल. त्यामुळे शासनस्तरावर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे बदल नवीन धोरणात करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप कमी होण्याची शक्यता आहे.
या बदल्या राज्यस्तरावर होणार असल्या, तरी त्या त्या जिल्ह्यातील शिक्षकांना ऑनलाईन अर्ज संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयात करावा लागणार आहे. शिवाय बदलीइच्छुक शिक्षकांचे विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून रोस्टर(बिंदू नामावली) तपासल्यानंतरच होणार असल्याचे नवीन धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे; तर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी यापूर्वी असलेले शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आले आहेत. नवीन धोरणानुसार जिल्हा परिषदांकडून ना हरकत दाखल्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात असल्याने त्यातून शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
...
महत्त्वाच्या बाबी कोणत्या?
- बदलीसाठी जिल्हा परिषदेमध्ये त्या वर्षाच्या ३१ मेअखेर किमान ५ वर्षे सलग सेवा होणे आवश्यक आहे.
- तो शिक्षक त्या पदावर कायम असणे आवश्यक आहे.
- जास्तीत जास्त चार जिल्हा परिषदांची निवड करण्याची मुभा राहील.
- बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती व बदलीच्या जिल्ह्यात रुजू होण्याबाबत कार्यवाहीसाठी १५ दिवसांचा कालावधी
- एक महिन्यानंतर बदली रद्द करता येणार नाही
- बदली रद्द करण्याण्याचा अधिकार हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचाच असेल.
- बदली आदेश रद्द करणे, हा संबंधित शिक्षकाचा हक्क नसेल. याबाबत शासनाकडे अपील, विनंती करता येणार नाही.
- बदलीसाठी दबाव आणल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही होईल.
...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलासाठी जाहीर करण्यात आलेल्या धोरणात अनेक चांगल्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू आणि कार्यमुक्तीचे अधिकार देण्यात आल्याने राज्यभरात कार्यमुक्तीमध्ये एकसूत्रता राहणार नाही. जिल्ह्यात शाळा देताना काहींवर अन्याय होण्याची शक्यता आहे. कार्यमुक्त होणाऱ्या शिक्षकावर नवीन नियुक्तीस व सेवाज्येष्ठतेवर अन्याय होईल. त्यात पती-पत्नी बदली एकत्रीकरण यात आणखी सुधारणा हव्या होत्या.
- सुधीर घागस, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com