परीक्षेच्या मूल्यांकनात सहभाग नाही!

परीक्षेच्या मूल्यांकनात सहभाग नाही!

मुंबई, ता. २७ : काही महाविद्यालये व प्राध्यापक हे परीक्षेच्या मूल्यांकनात सहभागी होत नाहीत. यामुळे परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विलंब होतो. म्हणून अशा महाविद्यालयांवर व मूल्यांकन न करणाऱ्या प्राध्यापकांवर विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.

विद्यापीठ कायद्यानुसार एखाद्या परीक्षेचा निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करता येतो; परंतु वेळेत मूल्यांकन न झाल्याने विद्यापीठाला निर्धारित वेळेत परीक्षेचा निकाल जाहीर करणे शक्य होत नाही. निकाल विलंबाच्या कारणाचा विद्यापीठाने शोध घेतला असता काही महाविद्यालये व प्राध्यापक मूल्यांकनात सहभागीच होत नसल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाने अशा महाविद्यालयांस व प्राध्यापकांना वारंवार सूचना देऊनही मूल्यांकनाच्या बाबतीत दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे.

महाविद्यालय व प्राध्यापकांनी मूल्यांकन करणे हे कायद्यानुसार बंधनकारक आहे. म्हणूनच अशा महाविद्यालयांवर व प्राध्यापकांवर महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. लवकरच अशा महाविद्यालयांना व प्राध्यापकांना पत्र पाठवण्यात येणार असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com