अतिरिक्त कचऱ्याचे महापालिकेकडून प्रभावी व्यवस्थापन

अतिरिक्त कचऱ्याचे महापालिकेकडून प्रभावी व्यवस्थापन

Published on

अतिरिक्त कचऱ्याचे महापालिकेकडून प्रभावी व्यवस्थापन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : सणासुदीच्या काळात शहरात वाढलेल्या कचऱ्याच्या प्रमाणाचा महापालिकेने प्रभावीपणे सामना करत वेळेत व सुरळीत निपटारा केला आहे.

गेल्या काही दिवसांत नेहमीपेक्षा सुमारे ३,००० मेट्रिक टन अतिरिक्त कचरा निर्माण झाला होता. त्यापैकी २,०७५ मेट्रिक टन कचरा कांजूर आणि देवनार डेपो येथे प्रक्रिया करण्यात आला असून, आणखी सुमारे १,००० मेट्रिक टन कचरा ट्रान्स्फर स्टेशनवरून उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत शहरातील दररोजचा सरासरी कचरा निपटारा ६,९०० टन इतका होता, मात्र सणांच्या काळात तो वाढून ७,३०० टन प्रतिदिन इतका झाला. ही वाढ दररोज सुमारे ६००ते ७०० टनांपर्यंत पोहोचली असली, तरी पालिकेच्या कार्यक्षम यंत्रणेमुळे या वाढीचे व्यवस्थापन सुरळीत पार पडले. सणांच्या काळात सर्व वॉर्डांतील सफाई पथकांनी अतिरिक्त शिफ्टमध्ये काम करून रस्त्यांवरील आणि संकलन केंद्रांवरील कचरा त्वरित उचलला. त्यामुळे शहरात कुठेही कचऱ्याचा साठा न होऊ देता स्वच्छता राखण्यात यश आले.

उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले, ‘सणासुदीच्या काळात अवघ्या काही दिवसांत ३,००० टनांहून अधिक कचरा निर्माण झाला. आमच्या सर्व पथकांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन हा अतिरिक्त कचरा वेळेत हाताळला. ही वेळेत केलेली साफसफाई आमच्या सज्जतेचे आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे द्योतक आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com